माझ्या लहानपणी सहसा रेडीमेड कपडे खरेदी नसायचीच,शाळेव्यतिरिक्त वर्षातून एकदा दिवाळीत आणि दुसऱ्यांदा उन्हाळ्याच्या सुट्टीत नवे शिवलेले वाढत्या अंगाचे 🤦‍♂️😉(ढगळे)कपडे मिळायचे.
त्यातही आईबाबा सोबत,त्यामुळे आपली आवड अशी काही फार नसायची..मळखाऊ, जाड, टिकायला मजबूत, स्वस्त आणि मस्त हेच क्रायटेरिया असायचे.

एकदा कपडा सिलेक्ट झाला की मग आमची स्वारी निघायची टेलरच्या दुकानात, तिथे वाढत्या अंगाची मापे 🤦‍♂️घेतली की बाबा टेलरला न विसरता एक वाक्य सांगायचे “चोर खिसा ठेवा बरं”… आपल्या आयुष्यात हा चोरखिसा म्हणजे जीव वाचवायला लागणारे पैसे #EmergencyFund.

कोणत्याही प्रवासात सहकुटुंब निघो वा एकटे बाबांनी चोरखिशात कायम एक ठराविक रक्कम ठेवायची सवय लावली. अगदी शेवटच्या वेळीच,कठीण काळातच त्याचा वापर करायचा.

लहाणपणी बऱ्याचवेळा विविध स्पर्धांसाठी तालुक्याच्या, जिल्ह्यांच्या ठिकाणी जायचो
आईबाबा जाताना २० ते ५० पन्नास रूपये द्यायचे. (त्यात महत्वाची सुचना असायची – जास्तीत जास्त बचत करून परत घरी आणायचे) त्यात सुट्टे ५ -१० रूपये वेगळे असायचे, काही खाऊ वाटले तर खर्च करण्यासाठी. मग बाकीचे पॅंटच्या खिशात, पाकिटात, बॅगेत आणि महत्वाचा Emergency fund चोरखिशात… ती सवय लहानपणी लागली ती आजतागायत… अगदी कोणत्याही व्यावसायिक प्रवासाची सूरूवातही आम्ही अशाच प्रकारे करतो.

तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण कोणत्याही जागतिक दर्जाच्या Wealth Management कंपनीचा आणि #आर्थिकसाक्षरता या विषयांमधील #गुंतवणुक या सदराचा हाच महत्वाचा पाया आहे.

आपल्याकडे जे पैसे असतात ते कधीही एकाच ठिकाणी न ठेवता किंवा गुंतवता ते वेगवेगळ्या ठिकाणी, वेगळ्या प्रकारात गुंतवायला हवेत. जर आपण एकाच ठिकाणी ते ठेवले/गुंतवले आणि न जाणो काही संकट आले तर तुमचे १००% खुप वाईट पद्धतीने नुकसान होते.

या कोरोना संकटात कित्येक उद्योग जे फक्त
एकाच प्रकारच्या व्यवसायावर अवलंबून होते त्यांचे आतोनात हाल झाले.

उदाहरणादाखल पर्यटन क्षेत्र अथवा हॅाटेल व्यवसाय घ्या अगदी शेती किंवा शेतीपूरक व्यवसायात (कुक्कुटपालन) अशा एकाच प्रकारच्या उत्पन्नात खुप धोके असतात..

हे नुकसान टाळायचे असेल तर सर्वोत्तम मार्ग म्हणजे
“Don’t Put all your eggs in one basket” हे कायम लक्षात असूद्या.

हे करताना सर्वप्रथम आपल्याकडे असलेल्या पैशांमधून Emergency Fund, Family Health Insurance, Self Term insurance आणि काही फिक्स्ड डिपॉझीट झाल्यानंतर बरेच गुंतवणुकीचे मार्ग उपलब्ध असतात.

त्यात कोणी सोनेचांदी,जमीन
शेती, फळबागा, दुकाने किंवा इतर मालमत्ता विकत घेतात. कोणी म्युचुअल फंड,शेअरमार्केट, ब्रोकर, सरकारी बॅांडस किंवा अगदी स्टार्टअप फंड मध्येही हल्ली गुंतवणुक करतात.

जर तुमच्या व्यवसाय असेल तर कधीच एकाच प्रोडक्टवर, एकाच ठराविक माणसावर, सप्लायरवर किंवा कस्टमरवर अवलंबून राहू नये. हे तत्व जर तुम्ही पाळले नाही तर एक ना एक दिवस संकट तुम्हाला खिंडीत गाठतेच!

कोणी कशात गुंतवणुक करावी हा खरतर फार वैयक्तिक आणि स्वत:कडे असलेल्या “धोके पत्करण्याची क्षमता” आणि ते “पचविण्याच्या मानसिक व आर्थिक बळावर” अवलंबून असते. यात महत्वाचा मुद्दा हाच की यापैकी किंवा इतर

कोणत्याही ठिकाणी पैसे लावताना ते एकाच ठिकाणी न लावता दोन – तीन वा अधिक ठिकाणी गुंतवावे म्हणजे अगदी कोणत्याही एका क्षेत्रात मंदी अथवा नुकसान झाले तरी फारसा फरक पडत नाही.

Diversification आणि मोठे निर्णय घेताना तज्ञांची मदत घ्यायलाच हवी आणि जर एकाच क्षेत्रात आपल्याला सर्व
पैसे गुंतवायचे असतील तर त्या क्षेत्रात संपुर्णपणे झोकून देऊन, ज्ञान घेऊन, प्रसंगी सिंहगडाच्या लढाईसारखे “कड्यावरील परतीचे दोर कापल्याने कड्यावरून उडी मारून जीव द्यायचा किंवा शत्रूसैन्यांना कापून विजयी व्हायचे”असा एकमेव मार्ग उरतो.

यात जेवढा मोठा धोका, तेवढाचा मोठा फायदाही
असतो. अशा कामांसाठी प्रचंड जिद्द, प्रखर आशावाद, फोकस, सतत २४ तास कामात गर्क, कुशाग्र बुद्धी आणि सोबत नशीबाची साथ असावी लागते.

पुढील काही आठवड्यात आपण यापैकी नक्की कोणती गुंतवणुक कधी आणि कशी करावी याबद्दल चर्चा करूच तोपर्यंत आहेत त्या पैशांचे किंवा जे येतील त्याची वर्गवारी
करून ठेवा.

हे पैशांचे नियोजन करायला एकदा शिकलो कि #आर्थिकसाक्षरता आणि गुंतवणुकीचा महत्वाचा धडा आपण सहजच शिकू. माझ्यासाठी हे लिखाण म्हणजे तरूणांसाठी #GiveItBack आहे, तुम्हाला भावले, रूचले तर इतरांनाही आर्थिक नियोजनाचे महत्व जरूर सांगा. 🙏

#SaturdayThread #मराठी